चाळीशी नंतर काय? कसे आयुष्य जगावे
जीवन जगताना योग्य वेळी हे ओझे उतरवून ठेवायलासुद्धा शिकले पाहिजे. हे ज्ञान आपल्याला संत, महंत आणि अध्यात्मिक गुरूंकडून मिळते. तरुण सागर महाराज हे सुद्धा त्यांच्यापैकीच एक होते. सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराज यांची ओळख होती. 'कडवे प्रवचन' ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध आहे. आदर्श जीवन कसे जगावे याबद्दल त्यांनी मांडलेले विचार अनुकरणीय होते. अशातच त्यांनी चाळीशी ओलांडलेल्या तसे त्यापेक्षा मोठ्या आणि छोट्या वयाच्या लोकांना संदेश दिला आहे- दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट सोडून चालणे सोडा. विसाव्या वर्षी खेळण्यांसाठी भांडणे सोडा. तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणे सोडा. चाळीसाव्या वर्षी रात्रीचे जेवण सोडा. पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे सोडा. साठाव्या वर्षी व्यवसाय तसेच नोकरी सोडा. सत्तराव्या वर्षी पलंगावर झोपणे सोडा. ऐंशीव्या वर्षी तामसी भोजन सोडा. नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा. शंभराव्या वर्षी हे जग सोडा. साधू मुनी कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसे जगू शकतात, याचे गुपितच जणू काही तरुण सागर महाराजांनी आपल्याला...